शहरयार… पुन्हा एकदा

जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें... यह जमीं चांद से बेहतर नजर आती हैं हमें..
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है, अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमे

शहरयार… ते गेल्याची बातमी काल टीव्ही पाहताना समजली. बार्शीत असल्यावर टीव्हीवर बातम्या पाहता येतात.

शहरयार म्हटलं की आठवतं… “गबन”मधली सीने में जलन… ही मायानगरी मुंबईचं सार्थ वर्णन करणारी गजल… आणि उमरावजानच्या सर्वच गझला… उमरावजान अनेकांना लक्षात राहतो रेखाच्या अदाकारीने… पण मला रेखाच्या अदाकारीपेक्षाही शहरयारचे शब्द महत्वाचे वाटतात.

उमराव जान मध्ये प्रत्येकाला भावलेल्या गजला वेगवेगळ्या असतील, पण मला शहरयारचे शब्द आणि त्यांची प्रतिक्षा सर्वाधिक भावते,

मग

इन आंखो की मस्ती के मस्ताने असो की दिल चीज क्या है आप मेरी असू द्या… पण त्यांचा सर्वाधिक अस्वस्थ करणारा प्रश्न म्हणजे “जब भी मिलती हैं मुझे अजनबी लगती क्यों हैं, जिंदगी रोज नये रंग में बदलती क्यों हैं…”   परवाच त्यांना ज्ञानपीठ मिळालं… महानायक अमिताभच्या हस्ते त्यांनी ते स्वीकारलं, त्यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर मी हिंदीतले एक महान साहित्यिक कमलेश्वर यांनी शहरयार यांच्यावर लिहिलेल्या एका लेखाचा स्वैर अनुवाद केला होता. त्यातून शहरयार यांना जवळून पाहता आलं. हा अनुवाद माझ्या ब्लॉगवर होताच… पुन्हा एकदा नव्याने कट पेस्ट करतोय एवढंच….

सीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं

Continue reading

फेसबुक : एक यश शेअर आणि कनेक्टचं…

It’s our birthday and we want to thank you for an amazing eight years. You continue to inspire us to provide a service that makes it easy for you to connect with the people and things you care about most.

माझ्या फेसबुक प्रोफाईलवर आलेलं हे फेजबुकचं ताजं स्टेटस… आज म्हणजे शनिवार 4 फेब्रुवारीचं… चार फेब्रुवारी हा फेसबुकचा बर्थ डे… आजचं वय म्हणाल तर फक्त आठ वर्षे… आठवर्षांपूर्वी म्हणजे 2004 मध्ये आजच्याच दिवशी फेसबुकचा जन्म झाला.

(दै. कृषिवल, मंगळवार 07/02/2012)

Continue reading

ट्वीटरची सेन्सॉरशिप!

“The open exchange of information can have a positive global impact … almost every country in the world agrees that freedom of expression is a human right. Many countries also agree that freedom of expression carries with it responsibilities and has limits.”

ही भूमिका आपण आपल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शाळेतच शिकलेलो असतो. म्हणजे भारतात प्रत्येकाला घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार आहे, याचा अर्थ असा नसतो की आपण दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी किंवा आपल्या स्वातंत्र्याने एखाद्याच्या भावना दुखावतील किंवा भडकतील… हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जबाबदारीतच अपेक्षित आहे. हीच भूमिका आपण शाळांमधून शिकलेलो असतो. आता ट्वीटरने पुन्हा एकदा याचीच आठवण करून दिलीय.

(कृषिवल, मंगळवार, दिनांक 31 जानेवारी 2012)

Continue reading

बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,

एका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय…

बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,
चार किताबें पढ कर वो भी हम जैसे बन जाएंगे..।

बहुतेक निदा फाजली यांची ही गजल असावी… अजून शोध घेतलेला नाहीय. मला नेहमीच असं वाटत आलंय की म्हणजे मी या विचारांचा आहे असं म्हणा.. काहीही चालेल… जगात किंवा आपल्या मानवी आयुष्यात सर्वात अनैसर्गिक बाब कोणती तर ती आहे संस्कार… होय, संस्कार, मला सर्वाधिक अनैसर्गिक बाब वाटते.

Continue reading

एक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा

सोपा आणि पिपा…

हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे…

सोपा म्हणजे SOPA आणि पिपा म्हणजे PIPA. त्याचा विस्तारीत रूप म्हणजे STOP ONLINE PIRACY ACT आणि PROTECT IP म्हणजेच INTELLECTUAL PROPERTY. हे दोन्ही कायदे आनलाईन पायरसी रोखण्यासंदर्भात अमेरिकी संसद म्हणजे काँग्रेसने प्रस्तावित केलेले कायदे आहेत.

आता एक महत्वाचा मुद्दा… हे सर्व हे काही होतंय ते अमेरिकेत, मग आपण त्या निषेधात सहभागी व्हायचं? किंवा आपला म्हणजे एक सर्वसामान्य वेब यूजर किंवा इनमिन इंटरनेटवर एखादा ईमेल आयडी किंवा फक्त फेसबुकवर अकांऊट एवढाच काय तो आपला वेबशी संबंध… बऱ्याचदा आपण ईमेल किंवा फेसबुक चेक करण्यासाठी कधीतरी इंटरनेट कॅफेमध्ये जातो, मग आपल्याला इथे भारतात बसून काय फरक पडणार आहे, कितीही कायदे आले तरी…

(कृषिवल, मंगळवार, दिनांक 24 जानेवारी 2012)
Continue reading

संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न!

  • पुण्यात माथेफिरू एसटी बस ड्रायव्हरचा धुमाकूळ
  • स्वारगेट डेपोतून बस ड्रायव्हरने पळविली बस
  • बस थांबवण्यासाठी पोलिसांकडून 10 राऊंड फायर
  • माथेफिरूच्या हैदोसात 9 मृत्युमुखी, 27 जखमी
  • माथेफिरू बस ड्रायव्हरचं नाव संतोष मारूती माने
  • संतोष मारूती माने, मूळचा उत्तर सोलापूर तालुक्याती, स्वारगेट डेपोत नोकरी
  • संतोष माने मनोरूग्ण – मानेचे कुटूंबीय आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर
  • संतोष माने मनोरूग्ण नाही, तो कालपर्यंत एसटीच्या सेवेत होता
  • माथेफिरू संतोष मानेनं मद्यसेवन केलेलं नाही

अशा अनेक बातम्यांची दिवसभर ब्रेकिंग न्यूज सुरू आहे. सकाळी टीव्ही सुरू केल्यावर एवढंच समजलं की कुणीतरी स्वारगेट डेपोतून एसटी बस पळवली आणि पुण्यातील रस्त्यावर सुसाट पळवत नेली. रस्त्यात जो कुणी येईल, त्याला ठोकरत माथेफिरू बसचालक पुढे गेला. बऱ्याचदा तो नो एन्ट्रीतून जात होता. अनेक रिक्षा, टूव्हीलर, छोट्या-मोठ्या कार याचा त्याने चक्काचूर केला. अनेकांना आपल्या बसखाली चिरडलं.

Continue reading

सोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल?

सलमान रश्दी यांनी जयपूरमधील साहित्य संमेलनात सहभागी होण्याला मुस्लीम मूलतत्ववादी गटांनी विरोध केला. सलमान रश्दी भारतात आले तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्यांचा फक्त जयपूरच नाही संपूर्ण भारत दौरा रद्द झाला. पहिल्यांदा त्यांच्या भारतात येण्याला विरोध झाला तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी व्हिसाची गरजच नाही, असंही वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपला दौराच रद्द केला. त्यानंतर आयोजकांनी व्हर्चुअल पद्धतीने म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सलमान रश्दी यांना जयपूर साहित्य संमेलनात सामील करून करून घेण्याचा प्रस्ताव पुढे केला. तर त्यालाही मूलतत्ववाद्यांनी विरोध केला. रश्दींनी भारतात येणं तर दूरच आम्ही स्वतः त्याचं तोंड पाहणार नाही की भारतात कुणाला पाहू देणार नाही, अशी दर्पोक्तीही या आंदोलकांनी केली. आणि आयोजकांनी जर सलमान रश्दी यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दाखवलं तर संमेलनातात हिंसाचार घडवून आणण्याची धमकीही दिली. त्यानंतर अगदी नाईलाजाने आयोजकांना रश्दी याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही रद्द करावं लागलं. त्यानंतर सलमान रश्दी यांनी ट्वीटरवरून व्यक्त केलेलं मनोगत म्हणजे

@SalmanRushdie #JLF Threat of violence by Muslim groups stifled free speech today. In a true democracy all get to speak, not just the ones making threats
@SalmanRushdie #JLF Videolink cancellation: awful

Continue reading

फक्त दोन वर्षे थांबा! 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल

आता तुमच्यापैकी अनेकांकडे 3G मोबाईल्स असतील. आता यापुढील व्हर्जन कोणतं, असं विचारलं तर साहजिकच तुम्ही म्हणाल की 4G… काही नाही सोप्पंय… प्रत्येकवेळी Gअक्षराच्या मागे एकेक क्रमांक वाढवत न्यायचा. सध्याचा जमाना 3Gचा पण तुम्हाला 2G आणि 1G तरी कुठे माहिती होते. म्हणजे तुम्ही ते वापरत होतातच, पण त्यांना कोणतं जी लावायचं, हे तितकंसं स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. 2G घोटाळ्याची जेवढी चर्चा झाली, तेवढीही किमान प्रत्यक्षात 2G वापरण्याची झाली नाही. 3G बँडविड्थच्या लिलावा मिळालेल्या प्रतिसादानंतरच आपल्याला 2Gच्या घोटाळ्याची कल्पना आली.
(www.starmajha.com)
Continue reading

कॉन्टेन्ट इज किंग!

SOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभर होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग आपल्याला काय त्याचं. पण एकदा का अमेरिकेनं असा कायदा केला तर जगातले सर्वच देश असा कायदा करायला सरसावतील. कारण अमेरिकेचं अनुकरण करण्याची एक सवयच आहे.

SOPA आणि PIPA चे समर्थकही मोठे आहेत. थोडक्यात हा वाद हॉलीवूड आणि सिलीकॉन व्हॅली यांच्यातला आहे. म्हणजेच कॉन्टेन्ट क्रिएटर आणि कॉन्टेन्ट डिस्ट्रीब्युटर… यांचातला…

टीव्ही असो की फिल्म किंवा प्रसारणाचं कोणतंही माध्यम… सर्वात महत्वाचा आहे तो कॉन्टेन्ट…. SOPA आणि PIPA यांचा विषय आता सुरू झाला असला तरी कॉन्टेट, त्याचं महत्व आणि डिस्ट्रीब्युशन यांच्यातल्या संबंधांवर न्यूज कॉर्पोरेशनचे प्रमुख रूपर्ट मरडॉक यांनी दोनेक वर्षापूर्वीच एका भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी या भाषणाचं ट्रान्सक्रिप्शन वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशितही झालं होतं. रूपर्ट मरडॉक यांच्या भाषणाचा जमेल तसा अनुवाद करण्याचा प्रयत्न मी दोन वर्षापूर्वी केला होता. जुने मेल चाळताना हा अनुवाद सापडला, स्टार माझा डॉट कॉम वरील ब्लॉगमध्ये दोनवर्षांपूर्वीच हा अनुवाद प्रकाशित झाला होता. सध्या सुरू असलेल्या अँटीपायरसी कायद्याची चर्चा सुरू असताना, त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना, हा अनुवाद पुन्हा एकदा ब्लॉगमधून प्रसारित करण्याचा एक प्रयत्न…
Continue reading

माहितीच्या मुक्त प्रवाहासाठी…

आपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे इंटरनेटच्या क्षेत्रातली म्हणजेच ऑनलाईन पायरसीला पूर्णपणे आळा बसेल, असं या कायद्याच्या समर्थकांना वाटतं.
http://starmajha.newsbullet.in/technology/technology/11950-2012-01-17-15-30-10
(स्टार माझा डॉट कॉमवर पूर्वप्रकाशित)
Continue reading

कन्नूरला हिंसाचाराचा शापही राजकीयच ?

केरळ म्हणजे देवभूमी. केरळ सरकार असो की तिथली जनता, केरळला गॉड्स ओन कंट्री असं मोठ्या अभिमानाने मिरवून घेतात. पण या देवभूमीत उत्तरेकडे एक भाग असाही आहे की देवभूमीचेच लोक त्याचा उल्लेख नरक असा करतात. हा भाग आहे कन्नूरचा. कन्नूर हा केरळमधला एक जिल्हा. लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं तर राज्यातल्या तिसऱ्या क्रमांकाचं शहर. म्हणजे कोची, तिरूवनंतपुरम् आणि कोळीकोडनंतर कन्नूरचाच नंबर लागतो.
Continue reading

लातूरची पंचविशी

मुंबईहून बार्शीमार्गे लातूरला गेलात की एक भव्य उड्डाणपूल तुमचं स्वागत करतो , लातूर या मराठवाड्यातल्या शहराविषयीचा तुमचा दृष्टीकोन बदलून टाकतो. उड्डाणपुलाच्या अगोदरच तुम्हाला एमआयडीसी लागते , आणि लातूर आल्याची जाणीव करून देते. तसं लातूर आपल्याला परिचित असतं, मुख्यमंत्र्याचं शहर म्हणून. लातूर पॅटर्न विकसित करणारं गाव म्हणून. मराठवाड्यातली एक महत्वाची बाजारपेठ म्हणून आणि भूकंपाचा भीषण धक्का सहन केलेलं गाव म्हणून………..
Continue reading

पंतप्रधानपद नाकारणारा नेता

कॉमरेड ज्योती बसू भारताचे पहिले कम्युनिस्ट पंतप्रधान झाले असते. नियतीने म्हणा किंवा या देशाच्या राजकीय समीकरणातून त्यांना ही संधी मिळाली होती. पण सबंध पश्चिम बंगालमधलं सबंध राजकारणच केवळ काँग्रेस विरोध, त्यातल्या त्यात केंद्रातल्या सत्तेकडून सातत्याने डावलल्याचा आभास यावरच आधारित असल्यामुळे डाव्या पक्षांचा या प्रस्तावाला होकार मिळणं कधी शक्यच नव्हतं. म्हणूनच देशाला कम्युनिस्ट पंतप्रधान मिळाला असता तरी डाव्याचा गड असलेला पश्चिम बंगाल त्यांच्याकडे राहिला असता का हा महत्वाचा मुद्दा होता. कदाचित या प्रश्नाच्या उत्तरामुळेच डाव्या पक्षाच्या धुरंधरांनी संयुक्त आघाडीचा प्रस्ताव नाकारला आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना एच डी देवेगौडा या देशाचे पंतप्रधान झाले. पण एका कम्युनिस्ट धुरंधराकडे देशाचं नेतृत्व कधी गेलंच नाही.
Continue reading

मास्तर

मास्तर, सातत्याने  देतच राहिले…

हे जग सोडून गेल्यावरही त्यांनी आपल्या पार्थिवाचं विद्युतदाहिनीत दहन करण्याऐवजी वैद्यकीय संशोधनासाठी दान केलं.
हयातीतच त्यांनी आपलं सर्व काही – म्हणजे सदाशिवातलं राहतं घर, पुस्तकं आणि ज्याला रूढ अर्थाने संपत्ती म्हणता येईल असं सर्व काही साधना ट्रस्टला देऊन टाकलं.
Continue reading

तंत्रज्ञानाचा पत्रकारितेवर परिणाम

(विमर्श – या ठाण्यातून प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकासाठी हा लेख लिहिला होता…)

टाईम्स ऑफ इंडियाच्या 17 डिसेंबरच्या अंकातली एक बातमी आहे. कॉम्प्युटर्स इमेजेस म्हणजेच व्हर्चुअल अँकर्स लवकरच खऱ्याखुऱ्या अँकर्सची जागा घेतील. अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातल्या मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनीयरिंग अँड अप्लाईड सायन्सेसच्या इंटेलिजेन्ट इन्फॉर्मेशन लॅब म्हणजे इन्फोलॅबमध्ये व्हर्च्युअल अँकर प्रोजेक्टवर काम सुरू आहे… टेक्स्ट अँड स्पीच टेक्नॉलॉजीवर हा प्रोजेक्ट आधारलेला आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे हा कॉम्प्युटर प्रोग्राम स्वतःच वेबवरून वेगवेगळी माहिती जमवून स्वतःच स्वतःचं स्क्रीप्ट तयार करेल, त्यासाठी आवश्यक ती व्हिज्युअल्स मिळवून ते एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सध्या या प्रयोगात काही अडचणी आहेत. लवकरच त्यावरही तोडगा शोधला जाईल.
Continue reading

सुनंदा पुष्कर आणि कळसूबाई शिखर…

कळसूबाई शिखर आणि सुनंदा पुष्कर यांच्यात तसं काहीच नातं नाहीय… असण्याचं कारणही नाही… नाही म्हणायला, सुनंदा पुष्कर जेव्हा भावी पतीसोबत म्हणजे शशी तरूर यांच्याबरोबर शिर्डी आणि शनी शिंगणापूरला आल्या होत्या तेव्हा त्यांना याच जिल्ह्यात असलेल्या कळसूबाई शिखराची माहिती कुणीतरी दिली असण्याची शक्यता आहे… तेवढाच काय तो संबंध फार तर बादरायण म्हणा हवं तर..
Continue reading

शिकायचं असेल तर इंग्रजीतूनच शिका…

राज्यात शालेय शिक्षणाच्या सुरू असलेल्या खेळखंडोब्यावर शनिवारी शिक्षण अधिकार समन्वय समिती पुण्यात आंदोलन करणार आहे… त्यासंदर्भातली एक लिंक मी फेसबुकवर शेअर केली होती. त्याला काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या. ज्येष्ठ सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांचाही या उपक्रमाला पाठिंबा आहे.. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत.
Continue reading

आता युद्ध अर्थव्यवस्था सुधारण्याचं…

अमेरिकेला आता युद्ध नकोय तर अर्थव्यवस्था सुधारायचीय. गेले सात वर्षे इराकमध्ये तळ ठोकून असलेलं अमेरिकी सैन्य आता परतीच्या वाटेवर आहे… आता तिथे शिल्लक असलेलं पन्नासेक हजार सैन्य पुढच्या वर्षभरात परतेल, सैन्याच्या परतीच्या या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष जॉन बिडेन जातीने हजर रहिले… त्यांनीच इराकी स्वातंत्र्याची मोहीम संपवत असल्याचं जाहीर करत उरलेलं पन्नास हजार सैन्य आजपासूनच ऑपरेशन नवी पहाट राबवणार आहे, आणि हे सैन्य इराकी सैन्याला शांतता आणि सुव्यवस्थेच्या कामात सहाय्य करणार आहे.
Continue reading

बार्शीविषयी…

बार्शी… तसं लौकिकअर्थाने कधीच गिरणगाव नव्हतं… जयशंकर मिल म्हणजेच बार्शी टेक्स्टाईल मिलचा भोंगा (सायरन) अजूनही वाजतो आणि बार्शीची ती एक खास ओळख आहे… बार्शी गिरणगाव नसलं तरीही…
Continue reading

उदगीर… इथेच जर्मन बेकरीतल्या स्फोटाचा कट शिजला

जर्मन बेकरी स्फोटाच्या लिंक थेट उदगीरपर्यंत पोहोचल्या… तसं सध्याच्या दहशतवादाच्या लिंक्स मराठवाड्यात तर केव्हाच पोहोचल्यात. त्यातल्या त्यात औरंगाबाद, बीड या गोष्टी तर आता बऱ्याच जुन्या झाल्यात…

पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या शैक्षणिक शहरात पहिला अतिरेकी हल्ला करण्याचं षडयंत्र मात्र उदगीरमध्येच रचलं गेलं. मराठवाड्यात लातूर, अहमदपूरपाठोपाठ उदगीर हे शिक्षणाचं मोठं केंद्र मानलं जातं. उदगीरचं महाराष्ट्र उदयगिरी क़ॉलेज म्हणजे त्या भागातलं एक मोठं प्रस्थ… ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राचार्य ना.य. डोळे याच कॉलेजात प्राचार्य म्हणून रुजू झाले आणि तिथूनच निवृत्त आले. त्यांनी या कॉलेजला वाढवलं.
Continue reading

फेसबुककरांवरील कॅनडातील संशोधन आणि त्यानंतर…

फेसबुकचा सातत्याने वापर करणारे नेटिझन आत्ममग्न, आत्मकेंद्री असतात, असा निष्कर्ष कॅनडातल्या यॉर्क विद्यापीठातल्या संशोधकांनी काढलाय. फक्त फेसबुकच नाही तर वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर वेळ घालवणाऱ्या व्यक्ती किंवा नेटिझन हे आत्ममग्न आणि स्वतःच्या तसंच स्वतःच्या विचारांच्या सर्वाधिक प्रेमात पडलेले असतात, असाही निष्कर्ष या संशोधकांनी नोंदवलाय. यॉर्क युनिवर्सिटीतल्या या संशोधकांनी सोशल नेटवर्किंगच्या संदर्भात अगोदर असलेल्या गैरसमजांना बळकटी देण्याचा प्रयत्न करत एकच एक असा सार्वत्रिक निष्कर्ष काढण्याची घाई केलीय.
Continue reading

कोण आहेत हे रमेश चंद्र त्रिपाठी

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने 24 तारखेला निकाल देऊ नये, यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी हे फार अगोदरपासून प्रयत्न करत होते, त्यासाठी त्यांनी लखनौ खंडपीठातच एक याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका तेव्हा फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, तेव्हा पहिल्यांदा त्यांची याचिका दाखल करून घेतली असली तरी त्यावर सुनावणी करण्यास नकार देण्यात आला होता. आज पुन्हा त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यात सांगण्यात आलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला 24 सप्टेंबरला म्हणजे उद्या निकाल देण्यावर निर्बंध घातले आहेत.
Continue reading

सीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं

भारतीय साहित्य जगतात शहरयार हे एक असं नाव आहे, ज्याची उर्दू कवितेच्या-शायरीच्या क्षेत्रातली सुरूवात साठच्या दशकात झाली. साठोत्तरी दशक म्हणजे सर्वच अर्थाने भारतीय साहित्यात नवनिर्माणाचं दशक आहे, मग मराठी असो की हिंदी किंवा उर्दू…

साठच्या दशकाच्या सुरवातीला उर्दू शायरीच्या क्षेत्रात दोन प्रवाह होते. दोघांचे मार्ग वेगवेगळे आणि ध्येयही.. एक प्रवाह होता, जो बंडखोरांचा म्हणजे परंपरेला पूर्णपणे नाकारून पुढे जाणाऱ्यांचा.. पूर्णपणे नवीन विचारांचा… जुन्याला टाकाऊ मानणारांचा तर दुसरा प्रवाह होता अभिव्यक्ती, अनुभव आणि मांडणीतल्या नवेपणावर विश्वास ठेवणारा.. त्याचवेळी परंपरेशी नाळ कायम ठेवणारा असा…
Continue reading

एकविसाव्या शतकाचं पहिलं दशकही संपलं

आज 31 डिसेंबर. 1 जानेवारी 2010 ला सुरू झालेलं वर्ष आज संपणार. फक्त वर्षच नाही तर 1 जानेवारी 2001 ला सुरू झालेलं दशकही आजच संपत आहे. हे दशक अनेक अर्थांनी महत्वाचं आहे, कारण हे एकविसाव्या शतकातील पहिलं दशक.

आपल्याकडे एकविसावं दशक सुरू होण्यापूर्वी त्याविषयी बरीच उत्सुकता होती, पण नवं शतक सुरू होण्यापूर्वी सर्वात जास्त बोलबाला होता तो Y2K चा, पण त्याची पुढे काहीच चर्चा झाली नाही. कॅलेंडरवरचं महिन्याचं पान सहजपणे पलटावं तसं प्रत्येक महिन्याप्रमाणे प्रत्येक वर्ष सरत गेलंय. प्रत्येक वर्षाच्या शेवटी वर्षभरातल्या ठळक घटनांची सालाबादप्रमाणे उजळणीही केली गेली. सर्व काही सराईतपणे…
Continue reading

अजित दादा, बार्शीला रस्तामार्गेच या… तुमचं स्वागत आहे

मा. अजित पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

आपण रविवारी नऊ तारखेला बार्शीला जाणार आहात, असं वृत्तपत्रांमधून आणि माझ्या बार्शीतल्या मित्रांकडून कळालं. चांगली गोष्ट आहे. बार्शीत आपलं चांगलं स्वागत होईलच…

तिथे तुम्हाला माहितीच असेल की, यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन आपल्या हस्ते होणार आहे. गेल्या 15-20 वर्षांपासून या केंद्राची निर्मिती होते आहे, आता ते पूर्ण झालंय. बार्शीकरांना विरंगुळ्याचं एक साधन मिळणार आहे.
Continue reading

महाराष्ट्राबाहेरचे पाच दिवस…

सुटी एन्जॉय करायची होती तर मग महाराष्ट्रातच का करावी, म्हणून जाणीवपूर्वक राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. तयारी काहीच नव्हती. सगळंच आयत्यावेळी ठरवलेलं… सुटी घ्यायचीय, फिरायला जायचंय, हे
Continue reading

आता आपल्याकडेही ‘नो टीव्ही डे’

29 जानेवारीला मुंबईत नो टीव्ही डे साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. अर्थातच हे आवाहन ही एक जाहिरात मोहीम आहे. एवढंच नाही तर एका बड्या मीडिया ऑर्गनायजेशनने म्हणजे हिंदुस्थान टाईम्सची प्रकाशन संस्था असलेल्या एचटी मीडियाने हा नो टीव्ही डे पाळायचं आवाहन केलंय. त्यासाठी ट्विटर, फेसबुक आणि स्वतंत्र वेबसाईट एवढंच नाही तर लोकल ट्रेन, बस गाड्या, रेल्वे स्थानकं, होर्डिंग यावर जाहिराती झळकावून या मोहीमेचा प्रचार प्रसार करण्यात येतोय.
Continue reading

महाराष्ट्र सरकारचे अठरा लाख स्वच्छ कर्मचारी?

काल गुरूवारी राज्यातल्या तब्बल 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांच्या जळीतकांडाचा निषेध करायचा होता, त्यांचा संताप समजण्याजोगा आहे. सोनावणे यांच्या हत्येचा निषेध केलाच पाहिजे. आपल्याकडे फक्त मंत्रालयच नाही तर जिल्ह्या-जिल्ह्यात, तालुक्या-तालुक्यात महसूल आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून आपला निषेध नोंदवला. त्यांचा एक सहकाऱ्याची हत्या झाली म्हणून हा निषेध होता.
Continue reading

अनागोंदी…

राज्यातल्या तेल, वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू… जीवनावश्यक वस्तू यांमध्ये भेसळ करणारे माफिया, टोलसम्राट, लाचखोर, अवैध वाहतूक करणारी धेंडं, मंत्रालयात आणि इतरत्र आपल्या ऑफिसात बसून लाच खाणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचं मनापासून मानणारे सरकारी-निमसरकारी कर्मचारी, त्यांना लाचलुचपतीच्या जाळ्यात पकडणारे एसीबीवाले, शिवाय नाक्यानाक्यावर वसुली करणारे पोलीस या सर्वांनी कसलेच पैसे खायचे नाहीत, कसलीच भेसळ करायची नाही असं ठरवलं तर किती अनागोंदी माजेल…
Continue reading

स्टार प्लसच्या अॅन्थेम साँगच्या निमित्ताने…

मी स्टार प्लसचा प्रेक्षक नाही, मात्र कामाचं ठिकाण स्टार हाऊसमध्येच असल्यामुळे स्टार प्लसचे नवीन प्रोग्राम कोणते, चॅनल नवीन काय करतंय, याची कल्पना असतेच. जुने-नवीन शो, त्यांना मिळणारा रिस्पॉन्स किंवा रेटिंग याचीही थोडीफार माहिती असतेच. 26 जानेवारीपासून स्टार प्लसवर अँथेम साँग सुरू झालं. तू ही तू…

सगळ्यात पहिल्यांदा ते काय आहे, हेच कळत नव्हतं.
Continue reading

भारतामध्ये संकल्पनांचा दुष्काळ?

भारतीय टेलीव्हिजनवर सध्या जिकडे पाहावं तिकडे रिअॅलिटी शोचा दबदबा आहे, वेगवेगळ्या धाटणीचे शोंचा रतीब सर्वच चॅनेलांवर सुरूय. या सर्व रिअॅलिटी शो मध्ये साम्य काय तर सर्वच्या सर्व शो किंवा त्यांच्या मध्यवर्ती कल्पना या कोणत्या ना कोणत्या विदेशी चॅनेलवरून किंवा कार्यक्रमांवरून उचललेल्या असतात. अनेकदा त्या मूळ कार्यक्रमांचं किंवा कॉन्सेप्ट डिझायनरचं नावही बाइज्जत दिलं जातं.

तसं पाहिलं तर रिअॅलिटी टीव्हीचा खरे मानकरी ठरतात, ते म्हणजे न्यूज चॅनेल… जे काही चाललंय, ते सर्व खरंखुरं… याची देही याची डोळा. न्यूज चॅनेलच्या यशातच कुठेतरी रिअॅलिटी शोच्या यशस्वी होण्यामागचं कारण दडलेलं असावं… रिअॅलिटी शो साठी कुठलीही स्टोरी किंवा स्क्रीप्ट लागत नाही. सगळं काही उत्स्फूर्त… म्हणूनच ते प्रेक्षकांच्या अधिकाधिक जवळ जाणारं आणि त्यांना जास्तीत जास्त भावणारं असावं..
Continue reading

एक महिला दिन… कळसूबाई शिखरावर


Continue reading

नो मोअर… अवरली बुलेटिन्स!

ई टीव्हीवर तासा-तासाला प्रसारीत होणारी बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आणि बुलेटिन्स बंद झाली. या महिन्याच्या सात तारखेपासून…
अवरली न्यूज अपडेटस् या ई टीव्हीचा अविभाज्य घटक होता, चॅनेल सुरू झालं तेव्हा म्हणजे जुलै 2000 पासून ही तासातासाची बातमीपत्रे प्रसारित व्हायची. ही वैशिष्ट्यपूर्ण बातमीपत्रे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाचा अंतर्गत निर्णय.. बाहेरच्या कुणाला त्यात ढवळाढवळ करता येणार नाही. त्यांचा कार्यक्रम ते कधीही बंद करू शकतात, सुरू करू शकतात.
Continue reading

नुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा?…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत.

रात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे.

आज सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या फेरीत पाचपैकी तीन मागण्या मान्य झाल्या आहेत. पण महत्वाच्या दोन अजून शिल्लक आहेत, चर्चा सुरूच राहणार आहे. जनलोकपालाच्या आंदोलकाच्या प्रमुख पाच मागण्या आहेत. त्यापैकी लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक संसदेत मांडावं, तसंच जनपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी आणि या समितीत सरकार आणि आंदोलकाचं प्रतिनिधीत्व समसमान म्हणजे पन्नास पन्नास टक्के असावं. आता सरकारने या तीनही मागण्या मान्य केल्या. म्हणजे समिती स्थापन होणार, त्यामध्ये आंदोसक आणि सरकार यांचं प्रतिनिधीत्व समसमान असणार, तसंच येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक संसदेत मांडणार… मात्र इतर दोन मागण्या म्हणजे या समितीच्या स्थापनेसाठी सरकारी अधिसूचना जारी करायला सरकार अजूनही तयार नाहीय तसंच या समितीचं अध्यक्षपद आंदोलकांच्या प्रतिनिधींकडे म्हणजेच अण्णा हजारेंकडे द्यायला तयार नाही.
Continue reading

का उभा राहिला देश अण्णांच्या मागे?

अण्णांनी उपोषण सोडलं. अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी प्रयत्न करणारांनाही आता हायसं वाटलं असेल. उपोषण सोडल्यानंतर अण्णांनीही जाहीर केलंय की ही तर फक्त

एक लढाई होती, म्हणजे सरकारला जनलोकपालासाठीच्या मसुदा समितीसाठी राजी करणं ही साधी बाब नाही. पण आता जन लोकपालचा मसुदा तयार होताना

समितीतल्या सर्वांनाच जागरूक रहावं लागणार आहे, या समितीत सर्वच जण थोर जाणते आणि कार्यकर्ते असल्यामुळे ते होईलच, पण सरकारी बाबू आपले प्रयत्न

थांबवणार नाही. हा सर्व नंतरचा भाग…

मला सर्वात महत्वाचं वाटतं ते अण्णांना मिळालेला पाठिंबा, हा पाठिंबा अभूतपूर्व होता, माझ्या पिढीने जेपीचं आंदोलन पाहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना जनआंदोलनाच्या

रेट्याची कल्पना नसणारच… पण आताच्या पिढीला देशविदेशात झालेली आंदोलने माहिती आहेत, ती त्यांच्यापर्यंत इंटरनेटने पोहोचवली आहेत.
Continue reading

…म्हणे निवडणूक लढवून दाखवा!

अण्णाचं उपोषण संपलं, अण्णा राळेगण सिद्धीमध्ये परतले, तिथं त्याचं जंगी स्वागत झालं. आता हळू हळू उपोषणाचा विषयही मागे पडतोय. मधल्या काळात आयपीएल आहे. 2G घोटाळ्यात आरोपपत्रही दाखल होऊ लागलेत. पुन्हा पाच राज्यातल्या निवडणुका आहेत… विषयांना काही तोटा नाही, पण मधल्या काळात चिडीचूप असलेल्या वाचाळ नेत्यांना आता वाचा फुटायला लागलीय.

अण्णांच्या उपोषणाच्या काळात अण्णांना जो देशव्यापी असा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला, त्यामुळे पायाखालची जमीन हललेले सर्वच नेते आता भानावर येऊ लागलेत.
Continue reading

काळ्या पैश्याचं काळं वास्तव

देशपातळीवर अण्णा हजारेंचं आंदोलन आणि जन लोकपाल विधेयक याची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने रात्री तब्बल दीडच्या सुमारास जलविधेयक मंजूर करवून घेतलं. त्यासाठी झोपलेल्या आमदारांना पुन्हा सभागृहात आणण्यात आलं. काही सभागृहातच होते कारण त्यादिवशी महिला आरक्षण दुरूस्ती विधेयकासाठी सभागृह उशीरापर्यंत सुरू होतं. राज्यातला पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणाऱ्या सरकारच्या या प्रयत्नावर मोठी टीका झाली, त्यानंतर सत्तेतला भागीदार पक्ष काँग्रेसला जाग आली आणि त्यांनी पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणार नसल्याचं स्पष्ट केलंय. हा सर्व घटनाक्रम वेगवेगळ्या वृत्तपत्रातून टीव्ही चॅनेलमधून येऊन गेलाय.
Continue reading

कॅग अहवाल : सरकारी हलगर्जीपणाचं पानोपानी वस्त्रहरण

राज्यात गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीची सत्ता आहे. नेमक्या याच काळातल्या सरकारच्या हिशेबाचा ताळेबंद कॅगने जाहीर केलाय. कॅगच्या अहवालात पानोपानी सरकारी योजना, त्यांची अमलबजावणी आणि प्रशासकीय हलगर्जीपणा यांचं वस्त्रहरण करण्यात आलंय.
Continue reading

सत्याच्या नावाने सत्यापलाप : सत्यसाईबाबा

I m praying for Shri Sathya Sai Baba’s quick recovery. Hope everyone will join me in praying for his return to good health. सचिन तेंडुलकरचा कालचा हा ट्विट त्याच्या किती चाहत्यांना आवडला, किंवा नाही आवडला माहिती नाही, पण माझा सचिन विषयीचा आदर या ट्विटमुळे नक्कीच कमी झाला.

त्याच्या तब्बल दहा-अकरा लाख फॉलोअर्सना त्याने हा ट्विट टाकलाय. तसंच अनेकवेळा रिट्विट झाल्यामुळे हा ट्विट कित्येक कोटी लोकांपर्यंत पोहोचला असेल. या ट्विटमुळे पहिल्यांदाच मला सचिन तेंडुलकर हा पुट्टपार्थीच्या सत्यसाईबाबांचा भक्त अनुयायी असल्याचं समजलं. टीव्ही मीडियात असूनही ही गोष्ट मला माहिती नव्हती. आमच्या कार्यलयातल्या अनेकांशी चर्चा केली तेव्हा अनेकांना पहिल्यांदाच सचिन सत्यसाईंचा फॉलोअर असल्याचं समजलं होतं, म्हणजेच मी याबाबतीत फारच मागास नव्हतो, याचंही समाधान वाटलं. पण आमच्यातल्या काही स्पोर्ट्स रिपोर्टर्सना मात्र सचिनच्या बाबाभक्तीविषयी कल्पना होती, स्पोर्ट्समधल्या काही मित्रांनी तर असंही सांगतिलं की त्याच्या कीटमध्ये सत्यसाईबाबांचा फोटो असतो, प्रत्येक वेळी बॅटिंगला जाताना तो बाबांच्या फोटोच्या पाया पढूनच मैदानात जातो म्हणे… Continue reading

ओसामा, अफगाणिस्तान युद्ध आणि वॉर स्पेशल बुलेटिन

ओसामा बिन लादेन.. 9/11 नंतर तब्बल दहा वर्षे अमेरिकेला अस्वस्थ करून सोडणारं नाव.. सोमवारी पहाटे म्हणजे अमेरिकेच्या कॅलेंडर प्रमाणे एक मे रोजीच अमेरिकन नेव्ही सील्सनी त्याचा खातमा केला. दहशतीचा एक अध्याय संपवला.
Continue reading

34 वर्षांच्या राजवटीचा अस्त

माझा एक बंगाली मित्र काही दिवसांपूर्वी मुंबईत भेटला होता. दीपक घोष… एमसीसीएसच्या स्टार आनंदो या बांगला न्यूज चॅनेलमध्ये रिपोर्टर आहे. त्याला निवडणुकीविषयी विचारलं, तर तो म्हणाला मोमता बंदोपाध्याय… त्याच्या दृष्टीने प्रश्न एवढाच होता की आता रेल्वेमंत्री कोण होणार… कारण मुख्यमंत्री तर मोमता बंदोपाध्याय, कधीच निश्चित झाल्या होत्या.
Continue reading

भीमाशंकर ट्रेक व्हाया शिडीघाट

शेवटी आम्ही कर्जत भीमाशंकर ट्रेक पूर्ण करायचा मूहूर्त निश्चित केला. आधी ठरवलेली तारीख एका आठवड्याने पुढे ढकलल्यानंतर रविवार 15 मे ही तारीख निश्चित झाली. पण प्रत्यक्षात निघाले तिघेच जण… मुंबईतून मी, संदीप रामदासी आणि त्यांचा सहकारी गजानन उमाटे… तसं मंचरहून आम्ही आमच्या चॅनेलचा पुणे ग्रामीणचा प्रतिनिधी अविनाश पवार यालाही बोलवून घेतलं होतं. अविनाश एकटा न येता आपल्या एका माहितगार मित्रालाही आणलं.. धनंजय कोकणे त्याचं नाव.. त्याने सह्याद्रीच्या परिसरात अनेक ट्रेक केलेत. त्याचा पूर्वानुभव आम्हाला बराच मोलाचा ठरला. असे सर्व मिळून पाच जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी सज्ज झाला.

Continue reading

ट्रेक वासोटा… कोयना बॅकवॉटरचा अविस्मरणीय अनुभव…

यावेळचा ट्रेक वासोट्याचा… फार ठरवावं वगैरे लागलं नाही. एक तारीख ठरली होती, आणि त्याच तारखेला मुंबईतून प्रस्थानही झालं… ज्यांनी आधी कबूल केलं होतं, ते सर्वजण आलेच.. काहीही कुरकूर न करता…

Continue reading

व्हर्च्युअल नव्हे; लोकशाहीचा ‘रिअल’ स्तंभ!

(कृषिवलसाठी लिहिलेला लेख)
न्यू मीडिया म्हणा किंवा वेब जर्नालिझम… हे माध्यमाचं एक तंत्रज्ञानाधिष्ठीत रूप.. पण अतिशय साधं. सोपं, सर्वांना सहज उपलब्ध होणारं आणि तरीही तुलनेनं स्वस्त.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संबंध माध्यम विश्वाचं भविष्य इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हापासूनच न्यू मीडियाचा जन्म झाला, फक्त त्याचं न्यू मीडिया किंवा नवमाध्यम असं बारसं फार उशीरा झालंय.
Continue reading

नापास तर शाळा झाल्यात….!

दहावीचा निकाल लागला. निकालादिवशी मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं.

दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन… पास झालेल्यांचे सर्वजण अभिनंदन करतीलच, पण नापासाचं विशेष कौतुक… कारण त्यांनी शाळेला आपल्या शिक्षणात हस्तक्षेप करू दिलेला नाहीय..

यापूर्वी बारावीची परीक्षा झाली तेव्हाही मी असंच फेसबुक स्टेटस अपडेट केलं होतं… ते असं होतं…

बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि न झालेल्याही सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन… उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांनी धाडसाने परीक्षा दिली, हे काय कमी आहे… परीक्षेतल्या यशापेक्षा परीक्षा देण्याची मानसिक तयारी जास्त महत्वाची आहे

या दोन्ही स्टेट्सला दहा बारा जणांनी लाईक केलं, काहींना स्टेट्स आवडलं, त्यांनी कॉमेन्ट केल्या… माझ्यासाठी दहावी-बारावीच्या निकालाचा दिवस हा नेहमीच अशा औत्सुक्याचा आणि तणावाचा राहत आलाय. दहावी-बारावी परीक्षा बोर्ड लाखो विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा घेतं… पेनाच्या एका फटकाऱ्यासरशी किंवा कॉम्प्युटरच्या एका क्लिकसरशी या लाखो विद्यार्थ्यांपैकी पास की नापास ठरवून टाकतं.. पुढे त्या विद्यार्थ्याचं काय होतं, कुणालाच त्याचं सोयरसुतक नसतं…

Continue reading

सोशल नेटवर्किंगचे फंडे बदलणारं फेसबुक

फेसबुक या सोशल नेटवर्किंगचा जन्म अगदी काही वर्षांपूर्वीचा आहे, म्हणजे फेब्रुवारी २००४ मध्ये ही साईट लॉंच झाली. आज जगभरात ६०० मिलियनपेक्षाही जास्त नेटीझन्स फेसबुक वापरताहेत. ६०० मिलियन म्हणजे ६००० लाख म्हणजेच ६० कोटी. फेसबुक ही काही कुणा सामाजिक संघटनेची किंवा एखाद्या सरकारची वेबसाईट नाही, तर पूर्णपणे खाजगी आहे. पण या वेबसाईटने सोशल नेटवर्किंगचे सगळेच फंडे बदलून टाकलेत.

Continue reading

पाऊस आणि मीडिया

(हा लेख कृषिवलसाठी लिहिला होता, तो 14 जूनला प्रकाशित झाल्याचं सांगण्यात आलं, पण त्यांच्या नेटवर कुठेच आठळला नाही. हा लेख लिहित असताना मुंबईत नुकताच पाऊस सुरू झालेला होता. रामदेवबाबाचं आंदोलन गुंडाळलं गेलं होतं. आता फक्त माझ्या ब्लॉगवर पुन्हा अपलोड करतोय, एवढंच)
मुंबईत पाऊस सुरू झाला तसा रामदेवबाबा आणि त्याचं आंदोलन मीडियातून हळू हळू ऑफस्क्रीन होत गेलं. मराठी माध्यमापुरतं म्हणाल तर टीव्ही, वृत्तपत्रे असो की इंटरनेट, मुंबईतल्या पावसाने बाबांच्या आंदोलनाला झोडपूनच टाकलं.

मुंबईतला पाऊस हा एक इव्हेंट म्हणता येईल, एवढा माध्यमांसाठी महत्वाचा झालाय. तसं 26 जुलैपासून त्याला हे स्टेटस मिळालं. 26 जुलैला जो काही जलप्रलय मुंबई आणि कोकणाने अनुभवला, त्यामुळे माध्यमांची या पावसाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली.
Continue reading

डिजीटल फर्स्ट : लोकाभिमुख

पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक विचार सुरू झालाय. हा विचार आहे, डिजीटल फर्स्ट म्हणजे माहिती प्रसारणाची जी अनेक माध्यमे आहेत त्यामध्ये अग्रक्रम कोणाचा तर वेब मीडियाचा. वेब फर्स्ट न्यूजरूम ही संकल्पना त्यातूनच पुढे आलीय. म्हणजे कुठल्याही वृत्तपत्राची, टीव्ही चॅनेलची किंवा अन्य प्रसारमाध्यमाची वेबसाईट ही त्या माध्यमाला, व्यवसायाला किंवा संस्थेला फक्त पूरक न ठरता, ही वेबसाईट हीच एक प्रमुख माध्यम आहे, ही धारणा तिकडे आता चांगलीच रूजलीय.
Continue reading

एका भाषणाचा प्रवास…

म्यानमारच्या लष्करी राजवटीविरूद्ध एक महिला तब्बल तेवीस वर्षांपासून लढा देतेय. तिला अनेकदा तुरूंगवास झाला तर कित्येक वर्षे ती आपल्याच घरात नजरकैदेत होती. तिला नोबेल पुरस्कारही मिळालाय. तिचं नाव आंग सान स्यू की. नाव सगळ्यांना तोंडपाठ असेल. पण गेल्या आठवड्यात एक महत्त्वाची घटना झाली.

ही घटना संबंधित आहे, तिच्या एका भाषणाशी. म्हणजे तिने एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि नावाजलेल्या व्याख्यानमालेत आपलं भाषण दिलं. ही व्याख्यानमाला आहे बीबीसीची. रीथ व्याखानमाला तिचं नाव. रीथ म्हणजे लॉर्ड जॉन रीथ, बीबीसीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक… दरवर्षी जगातल्या महत्त्वाच्या तज्ज्ञाला किंवा जाणकाराला या रीथ यांच्या स्मरणार्थ चालवल्या जाणार्या व्याख्यानासाठी आमंत्रित केलं जातं आणि नंतर बीबीसी ४ या रेडिओ चॅनेलवरून या व्याख्यानाचं प्रसारण केलं जातं. खरं तर या अत्यंत महत्त्वाच्या व्याख्यानमालेसाठी आमंत्रण मिळणं म्हणजे एक बहुमानच असतो.
Continue reading

वारी : एक आनंद यात्रा आणि बरंच काही

आज आषाढी एकादशी. पंचागाप्रमाणे देवशयनी एकादशी… म्हणजेच मोठी एकादशी… संबंध महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल होतात.

विठ्ठल रखुमाईकडे अब्जावधींचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा खजिना असल्याचं अलीकडेच उघड झालं असलं तरी विठ्ठल हा तसा गरीबांचा देव. सगळे वारकरी हे शेतकरी किंवा शेतमजूर…
Continue reading

प्रत्येक माणूस एक स्टोरी

या विश्वातला प्रत्येक माणूस म्हणजे एक स्टोरी आहे.. त्याचं जगणं, त्याचं विचार करणं, त्यानंतर त्याचा संघर्ष, त्यातलं नाट्य सर्व काही भन्नाट आणि जगावेगळं, विलक्षण… फक्त आपण ते कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही, कारण सब घोडे बारा टक्के, ही आपली शिकवण…

प्रचंड अशा दणकट असलेल्या या माणूस नावाच्या स्टोर्या काही अभिव्यक्त होतात, तरी काही तशाच व्यक्त न होताच गर्दीत मिसळून जातात, हरवतात, मागे पडतात, संपतात… तर त्याच्या उलट काही अभिव्यक्त झाल्यामुळे त्याची महाकाव्ये बनतात, रामायण-महाभारत असो की आपले सगळे असले-नसलेले आदर्श, या सर्व अशा व्यक्त झालेली माणसंच आहेत.
Continue reading

एक अनोखं सोशल नेटवर्किंग

मुंबईवर पुन्हा अतिरेकी हल्ला झाला. यावेळी अतिरेक्यांनी १३ जुलैचा बुधवार निवडला. तेरा तारखेवरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या. कबुतरखाना दादर, ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार परिसरात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. टीव्ही वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. व्हिज्युअल्ससाठी धावपळ… मग वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रत्यक्षदर्शींचे फोनो इंटरव्ह्यू, बाईट्स, पोलीस अधिकारी, राजकारण्यांच्या भेटी, रिपोर्टर्सचे वॉक थ्रू… सगळं काही ओघानेच. बॉम्बस्फोटानंतरचा दिवस दिवस वेगवेगळ्या पत्रकार परिषदांचा, वेगवेगळी पत्रके जारी करण्याचा. पण, पत्रकार परिषदा आणि पत्रकबाजी यांच्याही बऱ्याच पलिकडे एक माध्यम पोहोचलं आणि प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी झालं, ते म्हणजे सोशल नेटवर्किंगचं. यावेळी पुन्हा फेसबुक आणि ट्विटरने बाजी मारली. त्यातही ट्विटर अधिक उजवं ठरलं. त्याला कारण टीव्हीवर स्फोटाचं ब्रेकिंग सुरू झाल्यावर लगेचच सगळ्यांनी आपापल्या आप्तस्वकीयांना फोनवर सुखरूप असल्याचं कळवायला सुरूवात केली. दुसर्या बाजूला मुंबईत असलेल्या मित्र-स्नेह्याची, नातेवाईकांच्या चौकशीसाठी देशभरातून फोन सुरू झाले. त्याचं पर्यवसान मोबाईल नेटवर्क ठप्प होण्यात झालं. स्फोटाच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर काही मिनिटांतच मोबाईल नेटवर्क बिझी झाले.
Continue reading

मग एसटी तोट्यात का जाते?

एसटी महामंडळ आणि त्यांच्या वाहतूक व्यवसायाविषयी मला अनेक प्रश्न पडलेत… हे फक्त काही त्रोटक आहेत. या विषयावर खूप लिहायचं आहे, आता माझं एक प्रामाणिक मत असं तयार झालंय की एसटी ही कधीच प्रवाश्यांच्या सेवेसाठी नव्हती किंवा नसते, तर ते फक्त एक एक सरकारी महामंडळ किंवा व्यवसाय आहे, हा व्यवसाय फक्त कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि या महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी आहे. महामंडळाच्या व्यनवसायातून फक्त कर्मचारी आणि त्यांचे अधिकारी तसंच पदाधिकारी याचंच हित साधलं जातं.
Continue reading

न्यायदानात तंत्रज्ञानाचा वापर

न्यायदानात तंत्रज्ञानाचा वापर हा तसा आपल्याकडे नवीन नाही. मुंबईवर हल्ला करणाऱ्यांमधील एकमेव जिवंत असलेला अतिरेकी अजमल कसाब याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनेच झाली. इतर सर्व क्षेत्राप्रमाणेच न्यायालयीन कामकाजात संगणकाचा वापर आता सर्वमान्य झालाय. इतकंच नाही तर न्यायालयाच्या साईटवर आजचं कामकाज उपलब्ध झालंय. मग अधिक खुलेपणाच्या बाजूने आणखी एक पाऊल टाकायला काहीच हरकत नसावी.
Continue reading

K 2 S : एक अनुभव

कात्रज-सिंहगड नाईट ट्रेकचं आकर्षण तसं वर्षभरापासून होतं. म्हणजे आमची एक टीम या ट्रेकमध्ये गेल्या वर्षी सहभागी झाली. पुण्यातून परतल्यावर तब्बल महिनाभर तरी त्यांच्या बोलण्यात या ट्रेकशिवाय दुसरा विषयच नव्हता. उठताना, बसताना, जेवताना, चहा पिताना, ऑफिसला येताना, जाताना फक्त केटूएस.. सतत केटूएस केटूएस ऐकून कंटाळल्यावर मी ही पुढच्यावर्षी नक्की केटूएसला येणार, असं जाहीर करून टाकलं. पण आता तुमच्या केटूएसच्या गप्पा बंद करा, असंही सुचवलं.

Continue reading

युद्धाचे आखाडे आता बदललेत…

जगात यापुढील तिसरं महायुद्ध कोणा-कोणात आणि कधी होईल… हे सांगता येईल नाही, पण चौथ्या महायुद्धाविषयी मात्र नक्की सांगता येईल, की ते कधीच होणार नाही.. कारण ते लढण्यासाठी कुणीच शिल्लक राहणार नाही… अशा आशयाचा एक कोट आहे… नेमक्या कोणत्या तत्वज्ञाचा की विचारवंताचा, आता नेमकं आठवत नाही
बहुतेक आईनस्टाईन असावेत.

हा कोट इथे देण्याचं कारण असं की जगाने आजवर फक्त दोनच महायुद्धे आणि त्यातली अपरिमीत हानी अनुभवलीय, पाहिलीय. त्यामुळे तिसरं महायुद्ध झालंच, तर पुन्हा चौथं महायुद्ध खेळण्यासाठी त्यावेळी कुणीच शिल्लक नसेल. हे मात्र सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.
Continue reading

अण्णांसोबतची जनशक्ती मतपेटीतून व्यक्त होईल?

अण्णा तीन दिवसांच्या तिहारमधील मुक्कामानंतर आज बाहेर पडले. खरं तर गेल्या दोन दिवसात तिहारबाहेर जमलेल्या लोकांचा समुदाय घटत असल्याचीही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली होती. काँग्रेसच्या अंतर्गत सुत्रांनी त्यावरून पुन्हा अण्णांना मोर्चेबांधमी सुरू केल्याच्या बातम्या येत होत्या, पण आज अण्णा तिहारमधून बाहेर पडल्यानंतर सगळंच चित्र पालटलं. अण्णांना मिळालेला प्रतिसाद फक्त अभूतपूर्व आणि सरकार तसंच दिल्ली पोलिसांसाठी अकल्पनीय होता. आपापल्या मंत्रालयात बसून किंवा घरातून टीव्हीवर अण्णांच्या रॅलीचं चित्रण पाहत असलेल्या राजकारण्यांना ही गर्दी पाहूनच धडकी भरली असेल.
Continue reading

अरूणा रॉय धावल्या सरकारच्या मदतीला…

संसदेत मांडल्या गेलेल्या सरकारी लोकपाल विधेयकावर सर्वसामान्य जनतेच्या सूचना, प्रतिक्रिया आणि हरकती मागवणारी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित झाली आणि आजच्या आजच राष्ट्रीय सल्लागार परिषद म्हणजेच नॅकच्या सदस्य अरूणा रॉय आपला एक लोकपाल विधेयकाचा मसुदा घेऊन पुढे आल्या. आता तो हा मसुदा संसदेच्या स्थायी समितीपुढे मांडणार आहेत. म्हणजेच आंदोलन बगैरे काही न करता त्यांना लोकपाल विधेयकाचा मसुदा सरकारपर्यंत पोहोचवता येणार आहे. आणि सोनिया गांधींच्या मर्जीतील असल्यामुळे तसं माजी आयएएस आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या अशी कवच कुंडले असल्यामुळे त्यांना सरकार दरबारी सुरवातीला रामदेवबाबांना मिळाला, त्यापेक्षाही जास्त मान मिळणार आहे.

Continue reading

अण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट

अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. आणि त्यानी अण्णांना दिलेला ऑनलाईन सपोर्ट…

Continue reading

अण्णांचं आंदोलन आणि बार्शी

माझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…

Continue reading

अडवाणींच्या ब्लॉगवर मोदी

मोदींचा सद्भावना उपवास सोमवारी संपला. संपलेला संपूर्ण आठवडा तसा मोदींचाच होता. शेवटचे तीन दिवस त्यांच्या उपवासाचे तर त्यापूर्वीचे काही दिवस अमेरिकेने प्रकाशित केलेल्या एका अहवालाचे. या अहवालात मोदींना पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असल्याचा दावा करण्यात आला होता. अमेरिकी अभ्यासगटाचे प्रतिनिधी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी अजून अपरिपक्वअसल्याचा ठपका ठेवला.
(कृषिवलमध्ये मंगळवारी{20/09/2011} प्रकाशित झालेला लेख)
Continue reading

‘फेसबुक’ ही तर संधी!

फेसबुक आता कात टाकतंय. गुगल प्लसच्या आगमनानंतर निर्माण होणार्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी फेसबुकने हे बदल सुरू केल्याची चर्चा इंटरनेट विश्वात आहे. गुगल प्लस फेसबुकच्या तुलनेत कुठेच नसलं तरी सर्च इंजिन म्हणून गुगलचं असलेलं स्थान फेसबुकला काळजी करायला लावणारं आहे. त्यामुळेच भविष्यातली स्पर्धा ओळखून फेसबुकने बदल सुरू केलेत. या बदलांनी आधीच्या फेसबुकला सरावलेले अनेक फेसबुकर बुचकाळ्यात पडलेत. त्यांना दररोज नवनवे बदल आपल्या प्रोफाईल पेजवर झालेले दिसतायत. काहीजण त्याची तुलना गुगल प्लसबरोबरही करत आहेत. काहींना या बदलाविषयी नाराजी आहे, तर काहींनी स्वागत केलंय. त्यामुळेच फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने फेसबुकच्या फक्त आताच्या बाह्यांगावरून त्याला जज करू नका, असं आवाहन सर्व फेसबुकरांना केलंय. त्याच्यामते, आगामी काळात येऊ घातलेले बदल हे युजर फ्रेंडली आणि त्यांच्या अनेक गरजा ध्यानात ठेऊनच करण्यात येत आहेत.
(“कृषिवल”मध्ये मंगळवार {27/09/2011} प्रकाशित झालेला लेख)

Continue reading

देवाच्या दारीही शक्ती प्रदर्शन…!

या आठवड्यात बार्शीतला मुक्काम एक दिवसाने वाढला. सोमवारी रात्रीच निघायच्या ऐवजी मंगळवारी निघालो. अमावस्या होती. दुसऱ्या दिवशी घटस्थापना. आश्विन शुद्ध प्रतिपदा. माझी नेहमीची ट्रॅवल्स बस पकडण्यासाठी बार्शीमध्ये पोस्टाजवळच्या चौकात थांबलो. रिक्षावाल्याने मला त्या ठिकाणी सोडलं तरी मला रस्ता ओलांडून पलिकडच्या बाजूला पोहोचता येईना. कारण काय तर प्रचंड ट्रॅफिक. वेळ रात्री साडे अकरा-बारा वाजताची. यावेळीही बार्शीत ट्रॅफिक जाम असतं. हा एक नवा धडा मिळाला.
Continue reading

इंटरनेट: विकासाची मूलभूत गरज

If you are willing to sacrifice economic modernity and growth, then turn off the Internet, But if you want to be part of a vibrant, global marketplace and build a knowledge-based economy, you have to have an open Internet. … -Alec Ross, senior adviser for innovation to U.S. Secretary of State Hillary Clinton

‘इंटरनेट’ म्हणजे समृद्धी हे आता सगळ्यांनाच पटायला लागलंय. अलेक रॉस हे आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करतात. त्यांची अमेरिकी प्रशासनासोबत काम करण्याची सुरुवात मात्र त्याही अगोदर म्हणजे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रचार मोहिमेच्या काळात झालीय. बराक ओबामा यांनी ज्या पद्धतीने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रचार मोहिमेत आघाडी घेतली… हा आता सर्वांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्या प्रचार मोहिमेत सोशल नेटवर्किंगचा वापर कसा कसा करायचा, त्यामागचं डोकं हे या अलेक रॉस यांचं होतं. म्हणूनच आता जेव्हा ते इंटरनेट हे फक्त माहितीचं नाही तर समृद्धीचंही वाहक आहे, असं जेव्हा सांगतात, तेव्हा आपल्याला त्यांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकावं लागतं.
(कृषिवल, दि. 4 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेला लेख)
Continue reading

स्टीव्ह जॉब्स गेल्यानंतर…

स्टीव्ह जॉब्स बुधवारी गेला. आपल्याकडे बातमी समजली तेव्हा गुरुवार उजाडला होता. पेपरवाल्यांना त्याच्या निधनाची बातमी शुक्रवारच्या अंकात घ्यावी लागली. स्टीव्ह जॉब्स गेल्यापासून ते थेट आजपर्यंत आपापल्या मगदुराप्रमाणे त्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. जॉब्सच्या द्रष्टेपणाचं सगळ्याच लहानथोरांना कौतुक… सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कॉलेज ड्रॉपआऊट असूनही जगज्जेता असणं, जगभरातल्या लोकांना सर्वाधिक भावलं असावं.
(कृषिवल दिनांक 11 ऑक्टोबर 2011)
Continue reading

गुडबाय, गुगल बझ…!

आपल्याकडे सोशल नेटवर्किंग हा परवलीचा शब्द झाला, तो ऑर्कूटपासून… एक जमाना होता ऑर्कूटचा. ऑर्कूटवरचे स्क्रॅप हा एकेकाळी आपल्या दररोजच्या जगण्याचा एक भाग होता, फार जुनी गोष्ट नाही ही, झाली असतील फार फार तर पाचेक वर्षे… पण झुकरबर्गच्या फेसबुकने गूगलच्या ऑर्कूटला ओव्हरटेक केलं. फेसबुकच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी ऑर्कूटने अनेक बदल केले; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
(कृषिवल, मंगळवार, दिनांक 18 ऑक्टोबर 2011)
Continue reading

अण्णाचं ब्लॉगिंग… फक्त एकला चलो रे…

अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमधून आपली भूमिका स्पष्ट केलीय. आज त्यांनी ब्लॉगमधून राजकीय कट कारस्थान्यांबाबतीतली भूमिका स्पष्ट केलीय. आपल्या आंदोलनाबाबत राजकीय क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा नेहमीच होत असतात, मी त्याकडे विशेष लक्ष देत नाही, असं सांगूनच अण्णांनी आपल्या ब्लॉगची सुरूवात केलीय.
स्टार माझा मध्ये प्रकाशित

Continue reading

iSteve: the Book of Jobs च्या निमित्ताने….

स्टीव जॉब्जचं निधन झालं, त्याला आता पंधरवडा उलटून गेलाय. स्टीव जॉब्जच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्याच्या अनेक चाहत्यांनी मधल्या काळात मोठ्या प्रमाणात अॅपल्सच्या प्रॉडक्टची खरेदी केली. आता पुन्हा एकदा स्टीव जॉब्ज चर्चेत आलाय, यावेळी कारण आहे ते त्याच्या चरित्राचं… त्याच्यावरील पुस्तकाचं.
(कृषिवलसाठी लिहिलेला लेख)
Continue reading

दीपावली शुभेच्छा

माझ्या सर्व वाचकांना, ब्लॉगला फक्त भेट देऊन तो चाळणाऱ्यांना, सर्व मित्रांना, त्यांच्या परिवारांना, कुटुंबीयांना आणि सर्व परिचित तसंच अपरिचितांनाही दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा…

दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनीच दिल्या घेतल्या पाहिजेत, फक्त अट एकच आहे, त्यातली औपचारिकता टाळूयात, जमेल तितकी आणि शक्य होईल तितकं या औपचारिकतेला फाटा देऊयात, कारण आपल्याला कुठलीही निवडणूक लढवायची नाहीय की अन्य कुठेही जाऊन नेतेगिरी करायची नाहीय.

दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या नसल्या तरी त्या असतातच की, मी कुणाला शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा कुणाकडून स्वीकारल्या नाहीतर तर शुभेच्छा थोड्याच संपणार आहेत… शुभेच्छा विश्वाच्या अंतापर्यंत टिकतील, कारण त्याची ताकद अफाट आहे…

दिवाळी हा प्रकाशाचा, ज्योतीचा, उजेडाचा आणि तेजाचा उत्सव म्हणूनच साजरा व्हायला हवा. हीच फक्त एक माफक अपेक्षा…

शुभेच्छा तर आहेतच, लोभही वृद्धींगत व्हावा…

मेघराज पाटील
themeghraaj@gmail.com

सबसे बडा रूपय्या!

रूपयाचा नवीन आलेलं नाणं पाहिलंत? स्टीलचं अतिशय लहान… आता पन्नास पैसे किंवा पाच रूपयाचं नाणं असू द्यात, आकारात कसलाच फरक नाही, तेव्हाच पहिल्यांदा पटलं की खरंच रूपया बारीक झालाय…

म्हणजे अगोदर अर्थशास्त्रज्ञ किंवा त्यासंदर्भातले जाणकार कितीही सांगत असले की रूपयाचं मूल्य कमी होतंय, त्यावर सहजासहजी विश्वास बसायचा नाही, पण आताचा रूपया पाहिला की रूपयाचं मूल्य कमी झाल्याची खात्री पटते.

रूपयाच्या नव्या नाण्यात आपण अलीकडेच स्वीकारलेलं रूपयाचं नवं चिन्ह मुद्राकिंत केलेलं आहे, आकाराला अतिशय छोटासा असा हा रूपया..
Continue reading

नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

Change will not come if we wait for some other person or some other time. We are the ones we’ve been waiting for. We are the change that we seek. – बराक ओबामा

सोशल नेटवर्किंगने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आजपर्यंतची सर्व परिमाणेच बदलून टाकली. काही मोजक्या लोकांच्या पलिकडे अमेरिकेच्या संबंध जनतेला बराक ओबामा आणि त्याचं जगप्रसिद्ध वाक्य, ज्याला नंतर आपल्याकडे सुभाषिताचा दर्जा मिळाला, Yes We Can! ते फक्त अमेरिकेत नाही तर जगभरात पोहोचलं ते फक्त सोशल नेटवर्किंगमुळेच.
(कृषिवल 1/11/2011)
Continue reading

मुद्दा आहे मराठीचा…..

निवडणूक मग ती मुंबई महापालिकेची असो की बिहारच्या विधानसभेची… मराठीचा मुद्दा कुठेही केव्हाही कॅश होतो. आता राज्यातल्या 196 नगरपालिकांसह फेब्रुवारी मध्ये पंधरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. शहरी भाग असल्याने मनसे आक्रमक होईल. त्याची नांदी गेल्या काही दिवसात दिसलीय. विहार निवडणुकीच्या काळात जशी राहुल गांधींनी सुरूवात केली तशी आता संजय निरूपम यांनी केलीय, त्यांनी दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांना राज ठाकरेंनी दिवाळीनंतर उत्तर दिलंय. त्यांनी केलेल्या वक्तव्याचं कुणालाही कधीही समर्थन करता येणार नाही.
मुंबई बंद करण्याची धमकी देऊन मराठी माणसांना चिथावणी दिलीत तर राज्यात दंगली पेटतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. (बातमी) (स्टार माझातील बातमी) (व्हिडीओ) महाराष्ट्रात दंगली पेटतील की नाही माहिती नाही, पण प्रसार माध्यमे, फेसबुक, वृत्तपत्रे यामधून तर नक्कीच वाक् युद्धाला सुरूवात होईल.

यासर्व घटनाक्रमावर सविस्तर लिहायचं होतंच. त्याचवेळी माझा याच विषयावर एक ब्लॉग सापडला…

हा माझा एक ब्लॉग गेल्यावर्षी किंवा त्यापूर्वी लिहिलेला, नेमकी तारीख आता आठवत नाही. starmajha.com च्या जुन्या साईटवर प्रकाशित केला होता. बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाचा हा ब्लॉग आहे. पुन्हा जशाच्या तसा, मध्ये काही दिवस सध्याच्या ब्लॉगवर हा जुना ब्लॉग मी पेजच्या रूपात टाकला होता. नंतर तो काढून टाकला…. आज पोस्ट म्हणून टाकतोय
*********
Continue reading

अण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…

अण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Continue reading

नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण

आज आपल्याकडे ट्वीटरवर असलेले राजकारणी कोण कोणते, तर सर्वात पहिलं नाव येतं, शशी तरूर याचं. पण शशी तरूर हे राजकारणात येण्याआधीपासानूच ट्वीटरवर सक्रीय आहेत, एवढंच नाही तर सध्या त्यांची फॉलोअर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सत्तेच्या राजकारणातून म्हणजे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदावरून पायउचार झाल्यानंतरही ते ट्वीटरवर तेवढेच सक्रीय आहेत, जेवढे पूर्वी होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढतेच आहे. त्यांनी आपल्या ट्वीटने अनेकदा राष्ट्रीय पातळीवर होडलाईन होतील, अशा बातम्याही दिल्यात. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, भाजपच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज अशी काही मोजकी नावे ट्वीटरवर सक्रीय असलेल्यांची म्हणून घेता येतील. उमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्वीटमधून हेडलाईन्सच्या अनेक बातम्या दिल्या.
(कृषिवल:दिनांक 08/11/2011)
Continue reading

ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन आणि काही प्रश्न…

ऊस हे राज्यातलं एक पूर्णपणे राजकीय पीक आहे. ऊसाची लागवड करण्यापासून ते कारख्यान्याला नेईपर्यंत सर्व काही राजकारण… दुसरं काहीच नाही. कारखान्याला ऊस घातल्यानंतरही त्यातलं राजकारण संपतच नाही. कारण साखर निर्माण झाल्यानंतरही त्याची विक्री आणि निर्यात वगैरे धोरणातही राजकारण असतंच की.. शिल्लक राहिलेली साखर, त्याची साठवण, खुल्या बाजारातली विक्री, कारखान्याच्या निवडणुका, सभासद, त्याची कर्जे, कार्यक्षमता, सरकारची थकहमी असं सर्व काही राजकारण…
Continue reading

अंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल

अंबेजोगाईची एक बातमी आहे, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कदाचित. एव्हाना काही वृत्तपत्रांमध्येही येऊन गेली असेल. बातमी तशी साधीच आहे, तसं पाहिलं तर काही वेगळं नाही. फक्त फेसबुकचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, याचाच एक नमुना म्हणजे ही बातमी आहे.
(कृषिवल, दिनांक 15/11/2011)

Continue reading

सोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं

फेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल.

(कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)
Continue reading

थप्पड की गूंज… उतावीळ अण्णा आणि सोशल नेटवर्किंग

One may have a problem with politico who’s allegedly corrupt/inefficient, slapping him doesn’t make things right.

आज सकाळी कुणाच्या काही ध्यानी मनी नसताना एक बातमी आली, शरद पवारांना थोबाडीत मारल्याची… दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास… दिल्लीतल्या एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना. कार्यक्रम इफकोचा होता. एनएमडीसी बिल्डिंगमध्ये हा कार्यक्रम होता. तिथे कुणातरी हरविंदर सिंह नावाच्या एका माथेफिरूने शरद पवारांच्या श्रीमुखात भडकवण्याचा प्रयत्न केला. त्याचा संताप अनावर होता. आपल्या संतापाला त्याने फिल्मी स्टाईलने वाट मोकळी करून दिली. खरं तर याच हरविंदरने पाचेक दिवसांपूर्वीच दूरसंचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांच्या कानशिलात लगावण्याचाही प्रयत्न केला होता. यामुळे तो माथेफिरू आहे, हे तर स्पष्टच आहे.
Continue reading

तुम्हारा आंदोलन, आंदोलन… और हमारा नौंटकी…!

अण्णांच्या कालच्या उतावळेपणाचे पडसाद आजही उमटत आहेत. आज राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये ठाण मांडलंय. त्यांना म्हणे अण्णांच्या वक्तव्याचा निषेध करायचा आहे. मात्र त्यांना आपलं निषेध आणि आत्मक्लेष आंदोलन करू देण्यासाठी अण्णांचे कार्यकर्ते राजी नाहीत. आणि यामुळेच की काय आज राळेगणसिद्धीमध्ये तणाव आहे.
Continue reading

व्हाय धिस कोलावेरी डी…..?

व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी? ऐकलंय तुम्ही हे गाणं… सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजतंय… तसं हे गाणं थोडं तामिळ आहे आणि थोडं इंग्लिश… अगदी स्पष्टपणे सांगायचं तर तिग्लिंश… म्हणजे आपल्याकच्या मिंग्लिश किंवा हिंग्लिश सारखं… कोणत्याही भारतीय भाषेचं इंग्रजीबरोबर फ्यूजन केलं की अशी हायब्रीड भाषा जन्म घेते. आपली बंबईया हिंदीही अशीच मराठी, हिंदी आणि गुजरातीचं फ्यूजन आहे..

Continue reading

संदीप रामदासींचा ब्लॉग (sandeepramdasi.com)

एफडीआयची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. सरकारने रिटेल म्हणजेच किरकोळ दुकानदारीचं क्षेत्र थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुलं केलंय, तसं हे क्षेत्रं आधीही खुलं होतंच. पण त्यावर मर्यादा होती. सिंगल ब्रँडसाठी आधी ही मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत होती, म्हणजे नोकियासारख्यांना भारतात त्यांची उत्पादने विक्रीसाठी ठेवायची तर त्यासाठी भारतीय उत्पादक शोधावा लागे, आता त्यांची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलीय. तर मल्टिब्रँडमध्ये पन्नास टक्के थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा घालून देण्यात आलीय.

याला भाजप आणि डाव्या आघाडीसह अनेक विरोधी पक्षांनी विरोध केलाय. एवढंच नाही तर डीएमके आणि तृणमूल यासारख्या सत्ताधारी आघाडीतल्या पक्षांनीही विरोध केलाय. गेले सात दिवस संसदेचं काम चालू दिलं जात नाहीय. सरकारने वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले. पण काहीच उपयोग होत नाही. अगदी अण्णा हजारेही एफडीआयला विरोध करत आहेत.

मग अशावेळी सध्या देशात असलेल्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा रिटेलमध्येच आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीचे नेमके काय काय तोटे झालेत किंवा फायदे मिळालेत, हेही पाहणं आवश्यक ठरतं… नुसतं साप साप म्हणून भुई थोपटण्यात काहीच हशील नाही…

माझा मित्र संदीप रामदासी यांने आपल्या ब्लॉगवर वॉलमार्टची दुकानदारी या नावाने सध्या वॉलमार्टचं भारतातलं काम कसं चालतं, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय.
Continue reading

लोकलमध्ये भेटलेले प्रा. संदीप देसाई

मला रोज घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करताना मुंबईच्या तिन्ही लोकल ट्रेनचा वापर करावा लागतो. म्हणजे नेरूळ ते कुर्ला हार्बर, त्यानंतर कुर्ला ते परळ सेंट्रल मेन आणि त्यानंतर एलफिन्स्टन रोड ते महालक्ष्मी असा वेस्टर्न लाईनचा प्रवास…

महालक्ष्मी ते एलफिन्स्टन या प्रवासात ट्रेनमध्ये जागा असली तरी कधी बसण्याचा योग सहसा येत नाही. कारण लोअर परळ हे एक स्टेशन पास झालं की लगेच उतरण्याचे वेध लागतात. कधी कधी जागा असेल तर किंवा मोठ्या मुश्कीलीने मिळाली तर परळ ते कुर्ला दरम्यानच्या प्रवासात कधीतरी बसायला मिळतं. कुर्ला ते नेरूळपर्यंत नेहमीच जागा किंमान उभे राहण्यापुरती तरी मिळावी असं नेहमीच वाटतं पण मिळतेच असं नाही.
Continue reading

माहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास

सोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. अजूनही उमटत आहेत. यावरून सरकारला एवढं तरी नक्कीच उमजलं असेल की सोशल नेटवर्किंगवर सेन्सॉरशिप लादणं हे काही तितकंसं सोपं नाही. त्यामुळे एका खूप मोठ्या लोकक्षोभाला तोंड द्यावं लागणार आहे.
(कृषिवल दिनांक 13 डिसेंबर 2011)
Continue reading

सरत्या वर्षावर छाप अण्णांचीच…

लोकपाल आता दृष्टीक्षेपात आलंय, पण प्रत्यक्षात यायला अजून बराच अवकाश आहे. प्रत्यक्षात येईल की नाही हे अजूनही कुणी ठामपणे सांगत नाही. सरकारने सोमवारी लोकपालवर चर्चा केली. कदाचित आज किंवा उद्या ते संसदेत मांडलंही जाईल. संसद अधिवेशनाचा कालावधी वाढला जाण्याचीही शक्यता आहे. सरकारने फक्त लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यापुरतीच आपली जबाबदारी सीमित असल्याचाही दावा केलाय. म्हणजे लोकपाल विधेयक मांडायचं, त्याचं पुढे काय होईल, ते होईल… तंस गेल्या 40-45 वर्षांपासून ते प्रलंबित आहेच, फक्त महिला आरक्षण विधेयकाएवढी त्याची परवड झालेली नाही, हेच त्यातल्या त्यात एक समाधान…
(कृषिवल, मंगळवार, दिनांक 20 डिसेंबर 2011)
Continue reading

सोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….

इन बंद कमरों में मेरी सॉंस घुटी जाती है
खिडकियॉं खोलता हूँ तो जहरीली हवा आती है

प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्वर यांनी आपल्या ‘कितनें पाकिस्तान’ या कादंबरीची सुरुवात या ओळींनी केलीय. या ओळी कुणाच्या याचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला नाही. नंतरही माझ्या वाचनात त्या ओळी आलेल्या नाही. आता इथे त्याचा संदर्भ देण्याचा हेतू एवढाच की, सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या संदर्भात आता सुरु असलेल्या काही घडामोडी. यामुळे मला या ओळींचा पुन्हा एकदा शोध घ्यायला भाग पाडलं. मला फेसबुकच्या बाबतीत किंवा त्यासंदर्भात ज्या काही उलट सुलट बातम्या सध्या येत आहेत, त्यावर जे भाष्य करायचंय, ते नेमकं अशा द्विधावस्थेतलं आहे.
(कृषिवल, मंगळवार दिनांक 29 डिसेंबर 2011)
Continue reading

लटकलेलं लोकपाल आणि त्यानंतर…

लोकपाल लटकलं ते लटकलंच… कुणी काहीही म्हणो, पण गुरूवारी मध्यरात्री राज्यसभेत जो काही तमाशा झाला, त्यामुळे सरकार पूर्णपणे उघडं पडलं… आता सरकारचे सर्व वरीष्ठ मंत्री म्हणजे प्रणबदा किंवा पवनकुमार बन्सल किंवा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही नारायण स्वामी यांनी कितीही सांगितलं की आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा लोकपाल सादर करणार, पण त्यावेळी काय होणार, याचा ट्रेलर सबंध देशाने मध्यरात्रीच पाहिला.
Continue reading

निरोप सरत्या वर्षाला…

वाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011

सरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील…
थोडक्यात काय तर …

तुम चले जाओगे तो सोचेंगे…
हम नें क्या खोया, क्या पाया….

(कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012)
Continue reading

2011 : माझं ब्लॉगिंग

http://meghraajpatil.wordpress.com/2011/annual-report/

मित्रांनो, हा काही नवा ब्लॉग नाही… फक्त वर्डप्रेसच्या स्टॅटने पाठवलेली एक लिंक आहे, मी फक्त ती पब्लिश केलीय… फेसबुक आणि स्टीवरवर तर व्यवस्थित पोस्ट झालीय, त्यामध्ये वर्डप्रेसवर शेअर करण्याचाही ऑप्शन होता, पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय…

अण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)

2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण…

या तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्रतिसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम ठेवता आला नाही. त्याच पार्श्वभूमीवर स्टार माझा आणि नेल्सनने संयुक्त रित्या देशभरात एक सर्वेक्षण करून अण्णा इफेक्टचा आढावा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थातच हे सर्वेक्षण प्रातिनिधिक आहे. देशातल्या फक्त 28 शहरांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातली म्हणाल तर फक्त पाचच शहरे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर… अण्णांच्या तीनही आंदोलनानंतर आम्ही देशभरात अशा प्रकारचे सर्वेक्षण केलं होतं. त्या टप्प्यातला हे तिसरं सर्वेक्षण… परवाच ज्येष्ठ राजकीय आणि निवडणूक विश्लेषक योगेन्द्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना असं स्पष्ट केलं होतं की अण्णा अजूनही या देशातली एक चुकलेला बाण नाही. भलेही त्याचं मुंबईतलं आंदोलन फ्लॉप गेलं असलं तरी अजून त्यांच्यावर देशवासियांचा विश्वास आहे. टीम अण्णांने राजकीय प्रक्रियेला, राजकीय विचारांना सरसकट विरोध न करता भ्रष्ट राजकारणाला विरोध केला पाहिजे… अर्थातच हा विरोध लोकशाही मार्गानेच शक्य होणार आहे, आणि अण्णांना आणि त्यांच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला अपेक्षित असलेले बदल लोकशाही प्रक्रियेतूनच शक्य होणार आहे. कारण अण्णांमध्ये अजूनही लोकांचा विश्वास आहे… तोवर त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी लोक त्यांच्यासोबतच राहणार आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं कधीही समर्थन करता येणार नाही. तरीही त्यांनी चालविलेल्या मोहिमेला आपापल्या परीने पाठिंबा तर नक्कीच देता येईल.

Continue reading

2011 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2011 annual report for this blog.

Here’s an excerpt:

The concert hall at the Sydney Opera House holds 2,700 people. This blog was viewed about 12,000 times in 2011. If it were a concert at Sydney Opera House, it would take about 4 sold-out performances for that many people to see it.

Click here to see the complete report.

इंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही

एक चर्चा सुरू झालीय, पाश्चिमात्य देशांमध्ये… तशी ही चर्चा आपल्याकडे यायला अजून वेळ आहे. इंटरनेटच्या 3G स्पीडमुळे कदाचित सुरू होईलही आपल्याकडे लवकरच….

इंटरनेट हा मानवाधिकार असावा का, म्हणजे मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देण्याइतपत त्याचं महत्व असावं. तसं पाहिलं तर इंटरनेटचं महत्व आज कुणालाच अनुल्लेखित करता येणार नाही. कारण इंटरनेटची माहिती आणि संदेशवहनाची क्षमता अफाट आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत राहणार आहे.

इंटरनेट आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला असला तरी इंटरनेटने ज्यांच्या कल्पनेतून जन्माला आलं त्यांनीच ही एक नवी चर्चा सुरू केलीय, ती म्हणजे इंटरनेट हा मूलभूत मानवी हक्क असू नये…
(कृषिवल, दिनांक 10 जानेवारी 2012)
Continue reading

चित्रे शशिकांत धोत्रे यांची…

चित्रांवर लिहिणं खूप अवघड असलं पाहिजे, किंवा मला ते जमत नसावं, गेले दोन दिवस चित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण जमत नाही. अगदी खरं सांगायचं तर मला चित्रातलं फार काही कळत नाही.

तशी चित्रे फक्त आवडतात, बघायला… त्यातलं शास्त्र कळत नाही म्हणजे माध्यम, कागद किंवा कॅनव्हास यातलं काहीच कळत नाही. म्हणजे तुमचं ते मॉडर्न आर्ट वगैरे… किंवा अॅबस्ट्रॅक्ट अशी बरीच काही नावे असतात, जाणकार त्याचं कौतुकही करतात. त्यातून वेगवेगळे अर्थ शोधतात.

फक्त एवढं मात्र नक्की मला माहिती आहे, की चित्र हे सुद्धा एक अभिव्यक्तीचं माध्यम आहे. कविता, कथा, कांदबऱ्या, गेला बाजार फेसबुकवरील स्टेट्स किंवा ट्वीटरवरचे अपडेट्स याप्रमाणे शिल्पकृती किंवा चित्रकृती हेही एक अभिव्यक्तीचं माध्यम… तशी नाटक आणि चित्रपटही किंवा फोटोग्राफी सुद्धा… म्हणजेच कलाकृती कोणतीही असो, ज्याची त्याची अभिव्यक्तीच… एवढं मात्र समजतं. मला वाटतं, तेवढं जरी समजलं तरी पुरेसं आहे, एवढं कळत असूनही पण चित्रावर लिहायला पुरेशी सामुग्री जमत नाहीय.

Continue reading

इंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल?

मागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून दुसरं काही तरी नक्कीच आपल्याला अभिव्यक्त करण्यासाठी उपलब्ध होईल, पण जग आणि संपर्क विज्ञान-तंत्रज्ञान ज्या झपाट्याने बदलतंय, तो झपाटा पाहता खरोखरच फेसबुक बंद करता येईल का?..
(कृषिवल, दिनांक 17 जानेवारी 2012)
Continue reading